मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक सशक्त जनजागृती चळवळ मानव व वन्यजीव यांचे नाते हे संघर्षाचे नसून सहअस्तित्वाचे आहे. मात्र वाढते नागरीकरण, जंगलतोड, औद्योगिकीकरण आणि नैसर्गिक अधिवासांचा होत चाललेला ऱ्हास यांमुळे मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. या संघर्षात केवळ मानवाचेच नव्हे तर अनेक निरपराध वन्यजीवांचेही प्राण धोक्यात येत आहेत. अशा परिस्थितीत संघर्षानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संघर्ष होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, अचूक माहिती आणि जनजागृती हेच प्रभावी व शाश्वत साधन ठरू शकतात. या दृष्टीने जगातील प्रथम महिला सर्परक्षक व वन्यजीव संरक्षक, सरीसृपशास्त्रज्ञ, सर्पतज्ज्ञ व सर्पमित्र कु. वनिता जगदेव बोराडे या गेली अनेक दशके सोयरे वनचरे प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात, भारतात तसेच भारताबाहेरही वन्यजीव, निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण, संवर्धन व संशोधनाचे कार्य अखंडपणे करीत आहेत. मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची जनजागृती करणे, सर्पदंश व वन्यजीव हल्ल्यांवरील प्रथमोपचारा...
Comments
Post a Comment