Posts

Showing posts from January, 2024

सर्पमित्र वानिता बोराडे यांची शेतकरी प्रबोधनासाठी जिल्हा स्तरीय कृषी महोत्सव मेहकर येथे सर्प शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...

Image
सोयरे वनचरे प्रतिष्ठान द्वारे सर्प शिक्षण-प्रशिक्षण कार्यशाळा राबवून "साप शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे" हा संदेश जिल्हा स्तरीय कृषी महोत्सवातून उपस्थितांना समजाविण्यासाठी सर्प शिक्षण-प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत करून सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सापांची उपयुक्तता प्रत्याक्षिके सादर कारून सर्वांच्या निदर्शनास आणून दिली विषारी बिनविषारी साप कसे ओळखावेत, साप चावला असता काय उपाय करावेत, आपल्या आजूबाजूला साप येऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी, हे अगदी सहजतेने शेतकऱ्यांना समजावून सांगितले. सापबाद्दलची भीती नाहीशी होऊन, प्रिती वाढावी यासाठी शेतकऱ्यांना साप हातात देऊन त्याची वैद्यानिक माहिती हि दिली.                                           खासदार मा.ना.श्री.प्रताप्रावजी जाधव यांनी सुद्धा सापांचा स्पर्श अनुभवला तसेच मा.श्री.माधवरावजी जाधाव सभापती कृ.उ.बा.समिता मेहकर यांनी हि सापांना हाताळले व आपल्या मनातील भीती दूर केली मेहकर विधानसभा मतदार संघाचे चे लोकप्रिय आमदार...

"वन आणि वनिता बोराडे" हे वातावरणाशी व वन्यप्राण्यांशी समरस असणारे समीकरण !!

Image
भारत भूमी हि वन वैभवाने नटली असून नद्या, पर्वत, लेण्या, गड, किल्ले, नयनरम्य ऐतेहासिक पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे आणि वास्तुकलेचा जागतिक वारसा असणारी मंदिरे भारतीय संस्कृती ही वनसंस्कृती आहे. राम आणि कृष्ण हे अवतारी महापुरुष सुद्धा मानवी जीवनाचे धडे गिरवण्यासाठी व्यास, वाल्मिकी आणि सांदीपाणी  ऋषींच्या आश्रमात वनात    वास्तव्यास गेले कारण ऋषी-मुनी व संतांनी सूक्षम चिंतनातून वन्यप्राणी व मानवप्राणी याच्या सुसंबद्ध सहचाराची व परस्पर समृद्धीसाठी आवश्यक असलेली समन्वय व सृजनशील जीवनप्रणाली विकसित केली जे आधुनिक जगातातील प्रत्येक मानवासाठी कल्याणकारी आहे. हि जीवनप्रणाली म्हणजेच मानवाची सभ्यता आणि संस्कृती आहे. मानवाच्या अती हव्यासामुळे वन्यप्राणी आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून फक्त मानव केंद्रित समृद्ध जीवन हे निसर्गनियमांचे उल्लंघन करणारे असल्याने वन्यप्राणी व मानव यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. प्राचीनकाळी असे नव्हते, तर प्रत्येक भारतीय पूज्य देवी देवतांसोबत कोणता ना कोणता प्राणी असायचा आणि त्या प्राण्याला तेवढेच महत्त्व होते जेवढे त्या देवतांना महत्त्व असायचे जसे क...

सर्पमित्र वनिता बोराडे महाराष्ट्र जनगौरव पुरस्काराने महामहीम राज्यपाल श्री.रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानित

Image
  मेहकर येथील सर्पमित्र वनिता बोरडे यांचा सन्मान करताना राज्यपाल रमेश बैस. सोबत उपस्थित सुबोध सावजी,डॉ. राहुल सावजी दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी राजभवन मुंबई येथे महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या शुभहस्ते समाजामध्ये विविध क्षेत्रात आदर्श कामगिरी करणाऱ्या निवडक समाजसेवकांना महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केले असून संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर राहुल सुबोध सावजी यांनी आपल्या मातोश्री सपना सावजी यांच्या स्मरणार्थ वडील माजी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी यांचा समाजसेवेचा वारसा सातत्याने सुरू ठेवण्यासाठी आपण या कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे सांगितले. माजी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून गोरगरिबांची सेवा करून त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी राजकारणा सोबतच आपण सामाजिक सेवेचा वारसा जोपासत असल्याचे आवर्जून सांगितले शैलेश सुबोध सावजी व संपूर्ण सावजी परिवाराने या सत्कार समारंभात आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन केले कार्यक्रमाच्या मुख्य प्रबोधन पर भा...